सोलापुरी जोक्स

सोलापुरी जोक्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सोलापुरी जोक्स, Solapur.

स्वप्नांचं तुटलेलं पान... का तुटलेलं असेल?

शब्द माझेच होते, पण तू समजून घेतलं नव्हतंस
प्रेम होतं खरं, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं
शेवटी ते पान नशिबानेच फाडून टाकलं…

11/03/2026

उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा पेटवा घरच्या चुली.....

#चुल #गॅसतुटवडा #स्वप्नांचं_तुटलेलं_पान #आयुष्य

05/03/2026

जोडोनिया धन उत्तम व्यवहार,
उदास विचारे वेच करी..!

#तुका_म्हणे #तुकारामबीज #तुकाराम_ #संततुकाराम

श्री स्वामी समर्थ..
02/03/2026

श्री स्वामी समर्थ..

श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट हे खूप लोकांचे श्रद्धास्थान आहे त्यात मी देखील येते. माझी देखील स्वामींवर खूप श्रद्धा आहे त्यामुळे बऱ्याच वर्षापासून स्वामी मला अक्कलकोट दर्शनाला बोलवत आहे पण गेल्या दोन वर्षापासून जेव्हा पण मी अक्कलकोटला जाते तेव्हा बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या मला तुमच्या सोबत शेअर करायचे आहेत हे बघा मी जिथे जाते तिथे माझा जो काही अनुभव असतो तो चांगला असू देत किंवा वाईट असू देत मी तुमच्यासोबत शेअर करते आजची पोस्ट लिहिताना मन खरंच भारी झाला आहे लिहू की नको असे बरेचसे प्रश्न मनात असताना शेवटी लिहायला घेतलं महाराष्ट्र मध्ये खूप सारे श्रद्धास्थान आहे आणि जशी भाविकांची गर्दी ही वाढत जाते त्या पद्धतीने तेथील श्रद्धास्थान मध्ये काही काही पॉझिटिव्ह बदल हे झालेले आहेत तसेच अक्कलकोट मध्ये स्वामी संप्रदाय आणि भक्तगण हे देखील वाढत आहे आणि ते सर्व दर्शनासाठी येत असतात पण पूर्वी वटवृक्ष जे मंदिर होतं तिचा असा मोकळा हवा वगैरे येत होती आणि बरीचशी त्या मंदिराच्या आवारामध्ये जागा होती की जिथे आपण शांतपणे बसून ध्यान साधना वगैरे करू शकत होतो म्हणजे तिथे गेल्याचा समाधान हे मिळत होतो पण आज त्या वटवृक्षामध्ये वरून सगळं पॅक केलं गेलं आहे नाही तुम्ही करू शकतात पण काय होतं ना गर्दीच्या वेळी श्वासा कोंडला जातो आणि अशा वेळेस काही घटना जर घडली तर पटकन बाहेर पडता येत नाही कारण गर्दीत खूप असते बरं यावर्षी मी गेली तर दर्शनासाठी दोन रांगा होत्या हो चांगली गोष्ट आहे श्री पुरुष तुम्ही वेगळी रांग केली आहे पण काय आहे ना यामध्ये स्त्रियांना जवळून दर्शन मिळतं आणि पुरुषांना पहिल्यासारखंच मागूनच म्हणजे लांबून दर्शन मिळतात त्यात काय होतं स्त्रिया पुढे असल्यामुळे मागच्यांना व्यवस्थित पुढचे दिसत नाही जर तुम्ही एक एक करून प्रत्येकाला सोडलं तर सगळ्यांचा व्यवस्थित दर्शन होईल एकदमच घोळका असल्यामुळे नीट दिसत नाही शिवाय बाजूला स्वामींचा बिछाना आहे तिथे पादुका आहेत ते देखील बंदच होतं त्यानंतर समोरच्या हॉलमध्ये जाऊन आपण बसतो आणि थोडं तिथं साधना करतो तिथं देखील खूप गर्दी होते आणि श्वान देखील खूप सारे फिरत असतात याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे शिवाय आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तिथं खूप सारे भिकारी किंवा काहीतरी देवीच्या नावाने मागणारे अशी लोक जबरदस्ती अंगावर येतात आणि बाहेर निघाल्यानंतर चप्पल स्टॅन्ड जे आहे ते पूर्ण फिरून आपल्याला परत मंदिराजवळ जावं लागतं तर त्याची सोय अशी करा जेणेकरून एक्झिट गेट कडुन निघालं की आपण चप्पल स्टँड कडे जाऊ शकतो
आता दुसरी गोष्ट आहे भक्त निवासाबद्दल मला मान्य आहे की हे भक्त निवास आहे तर इथं तुम्हाला लक्झरीयस गोष्टी नाही मिळणार ठीक आहे समजतं पण थोडं फार लक्ष देणं गरजेचं आहे बाथरूम मध्ये किंवा वॉश बेसिन मध्ये अजून बेडवरच्या चादरी आहेत त्या देखील जर एखादे भक्तगण ते रूम सोडतील त्यानंतर चेंज केल्या पाहिजे रात्री खूपच डास असतात अशी एकंदरीत स्थिती प्रशासनाने थोडे यात लक्ष घातल्यास लाखो भक्तांचे हाल दूर होतील त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील बऱ्याच ठिकाणी स्वामींच्या पादुका ठेवलेल्या असतात तिथे देखील पैशांची मागणी केली जाते आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याला द्यायचे तो देऊ शकतो नाही द्यायचे तर नका देऊ मी फक्त सांगते आहे कारण अगोदर हे असं नव्हतं खरं सांगायचं झालं ना तर मला गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा महाराजांचा मठ इथे गेल्यावर खरंच इतकी शांतता मिळते ना मनाला आणि असं वाटतं की स्वामी इथेच आहेत याच आवारात आहेत स्वामी तिथं असल्याचा भास हा होतोच तासंतास तिथं बसून रहावसं वाटतं एवढं शांत आहे त्या गुरु मंदिर मध्ये पिन पडेल तरी आवाज येईल एवढी शांतता असते हे बघा आपली स्वामींवर श्रद्धा आहे म्हणून आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतही असो आणि मी देखील आजपर्यंत करतच होती पण एवढे वर्ष झाले तरी देखील ह्या गोष्टी काही बदल तुम्ही करत नाही म्हणून थोडं वाईट वाटलं हा माझा पॉइंट ऑफ व्हु आहे माझे विचार इथे बरेच जणांना पटणारही नाही हा लेख लिहिण्यामागचा माझा उद्देश एवढाच होता की जे कोणी हा सगळा कारभार बघतो आहे अक्कलकोट मध्ये त्यांनी या गोष्टीमध्ये थोडीफार सुधारणा करावी बाकी स्वामींची इच्छा स्वामी सगळं जाणतात
आणि हो फक्त हा लेख वाचून मला जज करण्यापेक्षा माझ्या पेजवर जाऊन बघा की ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याला देखील मी प्रोत्साहन दिलं आहे
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🌺🌹
!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!
🌹🌺🙏🌺🌹
स्वाती पाटील

जो भक्त इच्छा ठेवून स्वामींची भक्ती करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.आणि जो निष्काम भक्त असतो (काहीही अपेक्षा नसलेल...
02/03/2026

जो भक्त इच्छा ठेवून स्वामींची भक्ती करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
आणि जो निष्काम भक्त असतो (काहीही अपेक्षा नसलेला), त्याला मोक्ष मिळतो.

नृसिंह सरस्वती यांनी अनेक पापी लोकांचा उद्धार केला आणि नंतर ते कर्दळीवनात अदृश्य झाले.
पुढे लोकांच्या कल्याणासाठी त्यांना पुन्हा प्रकट व्हावे लागले
तेच पुढे स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले.

एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका बनवली, पण त्याबद्दल लोकांच्या मनात शंका आली.
कारण गुरुराज अदृश्य झाले आणि स्वामी रूपात प्रकट झाले, त्यामुळे त्यांचा जन्मकाळ ठरवता येत नाही.
ते अनादी आणि सिद्ध पुरुष आहेत. त्यामुळे जन्मपत्रिकेचा प्रश्नच उरत नाही.
लोकांच्या उद्धारासाठी त्यांनी मानव रूप धारण केले.

अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी स्वामी बसले होते आणि भक्तमंडळी त्यांच्या भोवती होती.
त्या वेळी एक इंग्रज साहेब कलकत्त्याहून दर्शनासाठी आले होते.
त्यांच्यासोबत एक पारशीही होता.

हे येण्याआधीच स्वामींनी तीन खुर्च्या आणायला सांगितल्या.
दोघांना दोन खुर्च्यांवर बसवले आणि स्वामी स्वतः तिसऱ्या खुर्चीवर बसले.

स्वामींचे तेज पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.
साहेबांनी विचारले, “आपण कुठून आलात?”

स्वामी हसून म्हणाले
आम्ही कर्दळीवनातून निघालो.

त्यानंतर आम्ही कलकत्ता शहर पाहिले, बंगाल देश पाहिला.
कालीचे दर्शन घेतले, गंगेच्या पवित्र तटावर गेलो.
नंतर हरिद्वार, केदारनाथ आणि अशी अनेक तीर्थे पाहिली.

त्यानंतर आम्ही गोदावरीकाठी आलो. ज्याची महती पुराणांत सांगितली आहे.
तेथे स्नान केले आणि पुढे हैदराबादला गेलो.

त्यानंतर मंगळवेढ्यात बरेच दिवस राहिलो.
पुढे पंढरपूरला गेलो आणि तेथेही काही काळ राहिलो.

त्यानंतर बेगमपूर, मोहोळ अशी ठिकाणे पाहून आम्ही सोलापूरला पोहोचलो.
सोलापुरात काही महिने राहून शेवटी अक्कलकोटला आलो.
तेव्हापासून आम्ही अक्कलकोटमध्ये आनंदाने राहतो.

हे ऐकून ते दोघे खूप समाधानी झाले आणि स्वामींची आज्ञा घेऊन निघून गेले.

स्वामी मंगळवेढ्यात १२ वर्षे राहिले, पण तेव्हा त्यांची प्रसिद्धी जास्त नव्हती.
ते नेहमी जंगलात राहायचे, गावात क्वचित यायचे.
आले तरी साध्या किंवा गलिच्छ जागी बसायचे.

कोणी काही खायला दिले तर ते स्वीकारायचे आणि लगेच पुन्हा जंगलात निघून जायचे.
गावातील लोक त्यांना “वेडा बुवा” म्हणायचे, कारण त्यांना त्यांचे खरे स्वरूप माहित नव्हते.
पण ते प्रत्यक्ष परब्रह्म होते.

त्या काळात दिगंबर नावाचे एक साधू होते.
त्यांना स्वामींचे खरे स्वरूप समजले होते आणि ते स्वामींना ईश्वर मानायचे.
पण इतर लोक अज्ञानामुळे त्यांना वेडा समजत राहिले.

दिगंबर स्वामींच्या दर्शनाला आले की स्वामी त्यांना विशेष दर्शन द्यायचे.
पुढील कथा अमृतासारखी आहे
ती ऐकणारा आणि सांगणारा दोघेही पवित्र होतात.

स्वामी समर्थांचे चरित्र हे क्षीरसागरासारखे आहे.
भक्तांनी मन उघडून ते ऐकावे आणि त्यात तल्लीन व्हावे.

जो भक्त स्वामींची सेवा करतो, त्याचे जन्म-मरणाचे भय दूर होते.
असे विष्णूंनीही सांगितले आहे.

#श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थअक्कलकोट #ब्रम्हांडनायक #गुरुमाऊली

Address

Solapur
413004

Telephone

+917775868113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सोलापुरी जोक्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सोलापुरी जोक्स:

Share