आमचं कल्याण - Aamcha Kalyan

आमचं कल्याण - Aamcha Kalyan कल्याण शहरातील चालू घडामोडी, पाहण्यासारखी ठिकाणे याविषयी माहिती Info & current affairs of Kalyan

शोक संदेशअभाविप कल्याण शाखेचे पूर्व कार्यकर्ते, हिंदू सेवा संघ, मामणोलीचे पूर्व उपाध्यक्ष, नूतन शिक्षण संस्था, बेतुरकरपा...
10/04/2026

शोक संदेश

अभाविप कल्याण शाखेचे पूर्व कार्यकर्ते, हिंदू सेवा संघ, मामणोलीचे पूर्व उपाध्यक्ष, नूतन शिक्षण संस्था, बेतुरकरपाडा, कल्याण (प) चे अध्यक्ष श्री.दीपक ब्रिद ह्यांचे, आज शुक्रवार दि.१० एप्रिल २०२६ च्या सकाळी, मुंबईत हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

अंत्ययात्रा आज सायंकाळी ६.०० वा. राहत्या घरून निघेल.

अंत्यदर्शन
तळमजला (Ground Floor), न्यू तुळशी शाम सोसायटी,
तुळशी टॉवरच्या बाजूस, महावीर नगर,
खडकपाडा, कल्याण (प)

ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती प्रदान करोत.

ओम् शांति 🙏💐

कल्याण पश्चिम येथील वृत्तपत्र विक्रेते सौ. सुनिता आणि श्री. पंकज बडगुजर यांची कन्या.
22/03/2026

कल्याण पश्चिम येथील वृत्तपत्र विक्रेते सौ. सुनिता आणि श्री. पंकज बडगुजर यांची कन्या.

जास्तीत जास्त नागरिकांनी उदयोन्मुख नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य नाटकं पाहण्यासाठी यावे ही विनंती.यातुन न...
06/11/2025

जास्तीत जास्त नागरिकांनी उदयोन्मुख नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य नाटकं पाहण्यासाठी यावे ही विनंती.

यातुन नवीन नाटककार, नाट्य कलावंत पुढे येतात.

डोंबिवली-कल्याण रिंगरोड लवकरच सुरू, खाडी किनाऱ्यालगत संपूर्ण मार्ग; ठाण्यापर्यंतचं अंतर कमी होणारकल्याण रिंगरोडचं काम मा...
06/11/2025

डोंबिवली-कल्याण रिंगरोड लवकरच सुरू, खाडी किनाऱ्यालगत संपूर्ण मार्ग; ठाण्यापर्यंतचं अंतर कमी होणार

कल्याण रिंगरोडचं काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्याप ते पूर्ण होऊ शकलेलं नाही. या रिंगरोडचं काम जागा हस्तांतरणानंतर सात महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कल्याणमध्ये रिंगरोड तयार केला जात आहे. या रिंगरोडमुळे शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मोठी मदत होणार आहे. पण या प्रस्तावित रिंगरोडचं उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी या मार्गातील अडथळ्याची महापालिका आयुक्तांसह 'एमएमआरडीए' च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या दरम्यान बाधित चाळधारकांचं तातडीने पुर्नवसन करत भूखंडधारकांना जागेचा टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि पुढील दोन महिन्यात सर्व जागा हस्तांतरित कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

रिंगरोडमुळे कल्याण-ठाण्यातील अंतर कमी होणार
दोन महिन्यांत सगळे अडथळे दूर झाल्यास पुढील सात्त महिन्यांत दुर्गाडी ते मोठागाव माणकोली या सर्वात मोठ्या टप्प्याचं काम पूर्ण करून देण्याचं आश्वासन 'एमएमआरडीए' कडून देण्यात आलं. या रिंगरोडमुळे कल्याण ते मोठागाव अंतर 10 मिनिटांत गाठणं शक्य होणार आहे. या रिंगरोडमुळे कल्याण आणि ठाण्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल.

वाहतूककोंडी फोडण्यासाठी रिंगरोड ठरणार फायद्याचा
मागील अनेक वर्षांपासून कल्याण, डोंबिवली शहरांतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित रिंगरोडचं काम सुरू आहे. या कामाचा वेगाने निपटारा करत नागरिकांना सुविधा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. या सूचनानंतर 'एमएमआरडीए'कडून जागा हस्तांतरण झालेल्या नसल्याचं कारण देण्यात आलं. त्याचा महापालिका प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला होता. यामुळेच बुधवारी सुट्टी असूनही महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संयुक्तिक दौऱ्याचं आयोजन केलं होतं. 'एमएमआरडीए'चे वरिष्ठ अभियंता मतीन साखळकर यांच्यासह अधिकारी आणि महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

सात महिन्यात रिंगरोडचं काम पूर्ण करण्याचे आदेश
दुर्गाडी जवळील गोविंदवाडी बायपासपासून दौऱ्याला सुरुवात करत तिसऱ्या टप्यातील संपूर्ण मार्गाची आयुक्तांनी पाहणी केली. यात रेल्वे प्रशासनासह स्थानिक नागरिकांच्या जागा बाधित होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या जागेबाबत तातडीने सुनावण्या घेत त्यांना मोबदला देत जागा 'एमएमआरडीए'कडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्पा. तर टप्पा क्रमांक 4 ते 7 दरम्यानची देखील आयुक्तांनी पाहणी करत माहिती घेतली.

'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी गोविंदवाडी रस्त्याचं काँक्रीटीकरण दोन महिन्यांत पूर्ण करण्याच सांगितलं आहे. तर संपूर्ण जागा हस्तांतरित केल्यानंतर त्यापुढील सात महिन्यात रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

तिढा सोडवणार
हा संपूर्ण मार्ग खाडी किनाऱ्यालगत असल्याने या जागांवर अतिक्रमण नाही, मात्र तरी शिवाजीनगर ते कोपर दरम्यान 42 घरं बाधित होणार आहेत. माणकोली पुलालगतच्या भूखंडाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने हा तिढा सोडवण्यासाठी आयुक्तांनी ही पाहणी केली. या दरम्यान बाधितांचं बीएसयूपी प्रकल्पात पुर्नवसन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या धुळीस मिळालेल्या २५० कोटीच्या ‘बीओटी’ प्रकल्पांतील ३५ अधिकाऱ्यांना मुक्तीकल्याण, डोंबिवली शहर...
05/11/2025

कल्याण डोंबिवली पालिकेच्या धुळीस मिळालेल्या २५० कोटीच्या ‘बीओटी’ प्रकल्पांतील ३५ अधिकाऱ्यांना मुक्ती

कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेगळ्या भागांमध्ये एकूण सुमारे २५० कोटी किमतीचे (बीओटी) प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.याप्रकरणातील प्राप्त तक्रारीप्रमाणे ठपका असलेल्या ३५ अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता पालिकेने केली.

वीस वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेचे महसुली उत्पन्नाचे स्त्रोत वाढावेत म्हणून कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेगळ्या भागांमध्ये एकूण सुमारे २५० कोटी किमतीचे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्वावर (बीओटी) प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या प्रकल्पांच्या निविदेपासून ते प्रकल्प उभारणीपर्यंत कामात अनेक अनियमितता होत्या. या प्रकरणाच्या प्राप्त तक्रारीप्रमाणे शासनाने केलेल्या चौकशीत पालिकेतील एकूण ३५ पालिका अधिकाऱ्यांवर ठपका ठेऊन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत कागदोपत्री हे प्रकरण लालफितीत अडकले. शासन निर्देशाप्रमाणे याप्रकरणातील ठपका असलेल्या ३५ अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता पालिकेने केली.

प्रकल्पाची वस्तुस्थिती
सन २००५ ते २००६ दरम्यान पालिकेने कल्याणमधील वाडेघर येथे जलक्रीडा केंद्र, रुक्मिणीबाई रुग्णालाजवळ बहुद्देशीय व्यापारी केंद्र, आधारवाडी येथे बहुद्देशीय केंद्र उभारणे, लालचौकी येथे व्यापारी संकुल, कल्याणमध्ये दुर्गामाता चौकात ट्रक टर्मिनल, विठ्ठलवाडी येथे व्यापारी संकुल, डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात व्यापारी गाळे असे प्रकल्प विकसित करण्याचे नियोजन केले होते. हे प्रकल्प सुमारे ३० ते ६० वर्षाच्या कराराने ठेकेदारांना सुमारे १५ ते ३० कोटीच्या कराराने चालविण्यास देण्याचे नियोजन होते.
गोंधळाला प्रारंभ

या प्रकल्पांच्या निविदेपासून ते ठेकेदार नियुक्तीत मोठा गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी शासनाकडे झाल्या. या तक्रारींची ठाण्याचे तत्कालीन जिल्हा प्रशानाधिकारी नंदकिशोर बुराडे यांनी चौकशी केली. या चौकशीत निविदा स्पर्धात्मक पध्दतीने राबवली नाही. आरक्षण फेरबदल न करता जागांचा ठेकेदारांना ताबा दिला, एमआयडीसीची मालकी असताना त्यांना न विचारता ठेकेदारांना जागेचा ताबा दिला. करारनामे नोंदणीकृत केले नाही. ६० वर्ष कोणत्या नियमान प्रकल्प ठेकेदाराला दिले यात स्पष्टता नाही. पालिकेचे आर्थिक हित यात बघण्यात आले नाही. बीओटी प्रकल्प ढिसाळपणे हाताळणारे पालिका अधिकारी या सर्व निष्क्रियपणाला जबाबदार असल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला होता. हा अहवाल कोकण विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी शासनाकडे दाखल केला होता.

विभागीय चौकशी
शासनाने चौकशी करून चौकशी अहवाल पालिकेकडे कार्यवाहीसाठी पाठविला होता. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियमाने पालिकेने ३४ अधिकाऱ्यांना पालिकेने विभागीय चौकशीसाठी नोटीसा पाठविल्या होत्या. या नोटिसीप्रमाणे ३४ अधिकाऱ्यांनी याप्रकरणातील अनियमिततेशी आपला कोणताही संबंध नसल्याची भूमिका घेतली. पालिका अधिकाऱ्यांचे खुलासे शासनाकडे प्रशासनाने पाठविले होते. हे खुलासे पाहून टप्प्याने याप्रकरणातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीतून निर्दोष मुक्तता केली.

निर्दोष मुक्त अधिकारी
सुनील जोशी, दीपक मोरे, प्रमोद कुलकर्णी, दीपक भोसले, तरूण जुनेजा, ए. एस. मुथाळ, विष्णू भडांगे, पी. के. उगले, जाधव, सुरेश पवार, विष्णु सातवी, अनंत सूर्यवंशी, अझिझ शेख, विनय कुलकर्णी, विसपुते, सुनील भावसार, भगवान घाडगे, गणपती नाईक, बबनराव कामटे, गो. ह. गवळी, संदीप तांबे, सचिन घुटे, सोमा राठोड, धमेंद्र गोसावी, राजेस वसईकर, श्रीकांत मुंढे, दिलीप खरे, भालचंद्र नेमाडे, चरण प्रकाश सिंग, सुनील हजारे.

शासन निर्देशाप्रमाणे विहित प्रक्रियेने वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे हा निर्णय घे्ण्यात आला आहे. योगेश गोडसे अतिरिक्त आयुक्त.

05/11/2025

कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

कल्याण शिळ रोडवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. निळजे रेल्वे ओव्हर ब्रीज पुर्नबाधणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिल्ली ते जेएनपीटी या डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील सीटीपी ११ या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या मार्गावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाची उंची कमी असल्याने डीएफसीसी च्या डबल कंटेनर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. यामुळे हा जुना उड्डाणपूल तोडून नव्याने त्याची बांधणी करण्यात येणार आहे. या कामासाठी 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत. नवी मुंबईसह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कल्याण शीळ मार्गावर निळजे उड्डाणपूलाच्या पुर्नबांधणी कामाला शुक्रवार पासून सुरुवात होत असून त्यासाठीचे वाहतूक बदल पुढीलप्रमाणे असतील.

• प्रवेश बंद 1 - कल्याण कडून शिळफाटा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण शीळ रोड, निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.

- पर्यायी मार्ग : सदरची वाहने निळजे कमान जवळून उजवीकडे वळण घेवून लोढा पलावा कडून कल्याण कडे येणाऱ्या वाहीनीवरून महालक्ष्मी हॉटेल पर्यत जावून पुढे इच्छीत स्थळी जातील.

• प्रवेश बंद 2 - लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन, एक्सपिरिया मॉल कडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे ब्रिज चढणीला, एक्सपिरिया मॉल बाजुला कल्याण शिळ रोड, कल्याण कडे जाणाऱ्या वाहीनीवर "प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

- पर्यायी मार्ग : सदरची वाहने कल्याण शिळ रोडने शिळफाटयाचे दिशेने जावून देसाई खाडी ब्रिज पार करून सरस्वती टेक्सटाईल समोरून उजवीकडे वळण (यु टर्न) घेवून नवीन पलावा फ्लायओव्हर ब्रिजवरून इच्छित स्थळी जातील

• प्रवेश बंद 3 - मुंब्रा, कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणाऱ्या
सर्व प्रकारच्या 6 चाकी व जड-अवजड वाहनांना मुंब्रा वाहतूक उप विभागाच्या हददीत कल्याण फाटा येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

- पर्यायी मार्ग : सदरची 6 चाकी व जड-अवजड वाहने कल्याण फाटा - शिळफाटा - मुंब्रा बायपास - खारेगाव टोलनाका मागे इच्छीत स्थळी जातील.

• प्रवेश बंद 4 - कल्याण कडून मुंब्रा कल्याण फाटा कडे जाणान्या सर्व प्रकारच्या 6 चाकी, जड-अवजड वाहनांना काटई चौक (बदलापुर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

- पर्यायी मार्ग : सदरची 6 चाकी व जड-अवजड वाहने काटई चौक (बदलापुर चौक) - खोंणी नाका तळोजा एम. आय. डी सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.

• प्रवेश बंद 5 - नवी मुंबई तळोजा एम.आय.डी.सी मार्गे खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथून काटई, बदलापूर चौक कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या 6 चाकी व जड-अवजड वाहनांना खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे "प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

- पर्यायी मार्ग : सदरची 6 चाकी व जड-अवजड वाहने खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे उजवे वळण घेवून बदलापूर पाईप लाईन -नेवाळी मार्गे इच्छीत स्थळी जातील.

हलके वाहन पर्यायी मार्ग

• नवी मुंबई, मुंबई, कडून कल्याण फाटा (मुंब्रा) मार्गे कल्याणचे दिशेने जाणाऱ्या कार, मोटार सायकल स्वारांनी कल्याण फाटा शिळफाटा- दिवा - आगासन फाटक - दिवा संदप रोड - मानपाडा, कल्याण शीळ रोड या मार्गांचा वापर करावा.

• कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर कडून नवीमुबई, मुंबई दिशेने जाणाऱ्या कार, मोटार सायकल स्वार यांनी चक्कीनाका श्री मलंग रोड नेवाळी नाका उजवीकडे वळून - बदलापर पाईपलाईन रोड - खोणी नाका - तळोजा एम आय. डी. सी. मार्गाचा वापर करावा

• कल्याण, डोंबिवली कडून ठाणे, मुंबई दिशेने जाणाऱ्या कार, मोटार सायकल स्वार यांनी डोंबिवली - मोठागाव मानकोली नाका किंवा दुर्गाडी कोनगाव - नाशिक मुंबई महामार्गाचा वापर करावा

• पनवेल, नवी मुंबई कडून महापे नवी मुंबई मार्गे कल्याण फाटा जंक्शन किंवा शिळफाटा जंक्शन येथे येणारे 6 चाकी व जड - अवजड वाहने कल्याण फाटा जंक्शन -शिळफाटा - मुंब्रा बायपास - खारेगाव टोलनाका पर्यायी रस्ता : या मार्गाचा वापर करावा

ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या सीमेवर नवे बिझनेस हब; १३०० एकर जागेची निवड पूर्णनवी मुंबई : बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाभोवती ...
03/11/2025

ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या सीमेवर नवे बिझनेस हब; १३०० एकर जागेची निवड पूर्ण

नवी मुंबई : बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाभोवती तब्बल १३०० एकर जागेत मुंबईतील बीकेसीप्रमाणे अत्याधुनिक बिझनेस हब उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि पनवेल या चारही महानगरपालिकांच्या सीमेवर हा मोठा व्यवसायिक पट्टा उभा राहणार असून, त्यामुळे या भागाच्या एकूणच विकासाला वेग मिळेल.

या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेला प्रमुख (नोडल) संस्था म्हणून नेमण्यात आले असून, जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (JICA) च्या सहकार्याने हा हब बीकेसीपेक्षाही अधिक आधुनिक स्वरूपात साकार केला जाणार आहे. याच्या माध्यमातून ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिझनेस केंद्र म्हणून उदयाला येईल.

---

१० गावांतील जमिनीचे अधिग्रहण होणार

ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद आणि काटई या गावांच्या हद्दीत एकूण १३०० एकर क्षेत्रात बिझनेस हबची रचना करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने जायकाच्या मार्गदर्शनाखाली जमिनी संपादनाची जाहिरातही अलीकडेच प्रसिद्ध केली आहे.

---

रोजगार वाढीस चालना आणि वाहतूक नियोजनाची तयारी

या प्रकल्पासाठी वाहतूक व्यवस्थापनाच्या १३ विशेष योजना तयार केल्या आहेत, ज्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल. निळजे ग्रोथ सेंटर, ऐरोली-काटई कॉरिडॉर आणि कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग या प्रकल्पांना या बिझनेस जिल्ह्यामुळे नवीन दिशा मिळेल. तसेच, सिडकोच्या खारघर येथील प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कलाही या हबमधून जोडले जाणार आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की, या नव्या बिझनेस हबमुळे ठाणे शहराची आर्थिक क्षमता वाढेल आणि शहराला नव्या औद्योगिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

कल्याणमधील शहाड उड्डाण पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद राहणारशहाड येथील उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले अस...
28/09/2025

कल्याणमधील शहाड उड्डाण पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद राहणार

शहाड येथील उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून पुलाचे सांधे तुटक झाल्याने पावसाचे पाणी आत मुरून गळती सुरू झाली आहे. पुलाची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तातडीने देखभाल, मजबुतीकरण आणि बेअरिंग बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे काम २८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून या काळात शहाड उड्डाण पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरून नियमितपणे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी सूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केली आहे.

कल्याणहून मुरबाडमार्गे माळशेज घाट, जुन्नर, अहिल्यानगर आदी भागात जाणारी तसेच भाजीपाला व फळे घेऊन येणारी मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर या पुलावरून होते. मात्र दुरुस्ती दरम्यान या वाहनांना पर्यायी रस्त्यांवर वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यायी मार्गांवर अवजड व जड वाहनांना सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग :

मुरबाड, माळशेज घाटाकडून येणारी वाहने : बारवी डॅम फाटा, मुरबाड येथे प्रवेश बंद करून बदलापूर रस्ता, पालेगाव, नेवाळी नाका, मलंगगड रस्ता, लोढा पलावा, शीळ डायघर किंवा पत्रीपूलमार्गे प्रवास करू शकतील.

मुरबाड तालुक्यातून येणारी वाहने : दहागाव फाटा (रायता गाव) येथे प्रवेश बंद करून वाहोली, मांजर्ली, एरंजाड, बदलापूर मार्गे पुढे जावीत.

कल्याण, भिवंडी, ठाणेकडून मुरबाड, माळशेज घाटकडे जाणारी वाहने : दुर्गाडी पूल येथे प्रवेश बंद राहील. या वाहनांना गोविंदवाडी वळण, पत्रीपूल, चक्कीनाका, नेवाळी नाका, पालेगाव, बदलापूरमार्गे पुढे जावे लागेल.

अत्यावश्यक सेवेची वाहने मात्र या बंदीपासून मुक्त ठेवण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्क्रीय कारभाराविरोधात नागरिकाचा आक्रोश, थेट मुख्य न्यायाधीशांकडे धावकल्याण-डोंबिवली महानगर...
28/08/2025

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्क्रीय कारभाराविरोधात नागरिकाचा आक्रोश, थेट मुख्य न्यायाधीशांकडे धाव

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्क्रीय कामकाजाविरोधात अखेर एका जागरूक नागरिकाने थेट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे धाव घेतली आहे. निशित शहा या नागरिकाने धाडसी पाऊल उचलत पत्राद्वारे कॅगमार्फत (CAG) केडीएमसीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शहरात दररोज वाढणाऱ्या समस्यांकडे स्थानिक प्रशासनाने कानाडोळा केल्याने संतप्त झालेल्या शहा यांनी पोस्टाद्वारे मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार धाडली आहे. भ्रष्टाचार, अनियमितता आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे केलेल्या सरळसरळ दुर्लक्षाचा हिशोब आता द्यावाच लागेल, अशी ठाम भूमिका या पत्रातून त्यांनी मांडली आहे.

कर घेतात पण सुविधा नाहीत!

“नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात, महसूल देतात; पण बदल्यात आम्हाला खड्डेमय रस्ते, वाहतुकीचा गोंधळ, अपुरी आरोग्यसेवा आणि निकृष्ट पायाभूत सुविधा मिळतात. हा सरळसरळ अन्याय आहे,” अशी जळजळीत टीका शहा यांनी पत्रात केली आहे.

दररोजचे हाल, प्रशासन मूकबधीर

रोज सकाळ-संध्याकाळ होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणारे अपघात, रुग्णालयांची दयनीय अवस्था आणि नियोजनशून्य विकासकामे – यामुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना भोगत आहे. तरीदेखील पालिका अधिकारी आणि निवडून आलेले प्रतिनिधी मात्र डोळेझाक करून गप्प बसले आहेत, असा थेट आरोप शहा यांनी केला आहे.

न्यायालयाची भूमिका महत्वाची

आता या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश भूषण गवई कोणती भूमिका घेतात, हे पाहणे नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना न्याय मिळेल का? की पालिकेचा निष्क्रीय कारभार असाच सुरू राहणार – हा प्रश्न कायम आहे.

लावा कॉल वाट्टेल तेव्हा...... टोल फ्री आहे.
08/08/2025

लावा कॉल वाट्टेल तेव्हा...... टोल फ्री आहे.

तीन ताडआज खेळायला कुठे जाऊ या रे? ते वायले (वायलेनगर) त्यांच्या शेतात येऊ देत नाहीत, तो जगनपण (गोल्डन पार्क) नाही म्हणतो...
01/08/2025

तीन ताड

आज खेळायला कुठे जाऊ या रे? ते वायले (वायलेनगर) त्यांच्या शेतात येऊ देत नाहीत, तो जगनपण (गोल्डन पार्क) नाही म्हणतो.

'मग चला तीन ताडाजवळ, आपलीच जागा आहे', आमच्यातला उमेश बोलला. तेव्हापासून ती आमची खेळण्यासाठी हक्काची जागा झाली. पावसाळ्यात तर रविवारच्या सुट्टीत तिथे फुटबॉल खेळायला खुपच धमाल यायची, कारण दुरदूरपर्यंत कुठलाही अडथळा असा नव्हताच. अंधार होईपर्यंत मनसोक्त हुंदडायचो.

हे उंचच उंच तीन ताड ही त्या जागेची ओळख होती. कारण आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात शेती आणि फक्त शेतीच होती, नाही म्हणायला तिथे एक मोठ्ठी विहीर होती (आहे) आणि सर्वांत महत्वाची होती ती 'पारशी विहीर' (आजच्या जिओमार्ट जवळची). पण त्या दुरून न दिसणाऱ्या गोष्टी होत्या. पैकी पारशी विहीर आज अस्तित्वात नाही, त्याजागी टोलेजंग व्हर्टेक्स कॉम्प्लेक्स उभे आहे आणि दुसरी मोठ्ठी विहीर क्रोमाच्या बाजूला झाकून ठेवली आहे. असो. पण दुरून दिसणारी ओळख म्हणजे तीन ताडच.

आज या परिसरातली अनादि काळापासून असलेली संपूर्ण सुपीक शेती 'मालकांनी' कागदावर कायमस्वरूपी 'नापिकी' दाखवून नष्ट करून त्याजागी ताडापेक्षाही चौपट उंच बांधकामं करून ठेवली आहेत. की ह्या ताडांचे अस्तित्व ही कुणाला जाणवत नाही.

१९८४ साली नगरपालिका 'महा' झाली (महान झाली की महाग झाली कुणास ठाऊक) आणि हळूहळू सगळीकडचा नकाशा (की निसर्ग) बदलत गेला. एकेकाळी असलेल्या पायवाटेचा रुंद काँक्रिटचा मार्ग करण्यासाठी या तिघांपैकी मधल्या ताडाचा आज (दि. १ ऑगस्ट २०२५) बळी गेला. उर्वरित दोघांचे आयुष्य अजून किती आहे ते काळालाच ठाऊक.

कालाय तस्मै नमः

बेकायदा बांधकामांचा भडका : कल्याण-डोंबिवलीतील काही नगरसेवकांची बेशरम भूमिका उघडी पडली!कल्याण-डोंबिवली शहरात नियम आणि काय...
30/07/2025

बेकायदा बांधकामांचा भडका : कल्याण-डोंबिवलीतील काही नगरसेवकांची बेशरम भूमिका उघडी पडली!

कल्याण-डोंबिवली शहरात नियम आणि कायद्यांना मुरड घालणाऱ्या, विकासाचे गळचेपी करणाऱ्या आणि जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या काही नगरसेवकांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. सत्तेच्या खुर्चीचा वापर जनतेच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःच्या खिशाची भर घालण्यासाठी करणाऱ्यांची ही बेकायदा यंत्रणा आज शहराच्या माथी बसली आहे.

‘बेकायदा झालीच पाहिजे’ म्हणणाऱ्या नगरसेवकांची बिनधास्त निर्लज्जता!

पालिकेच्या अधिकाऱ्यांचे बळी गेले तरी चालतील, पण बेकायदा बांधकामं झालीच पाहिजेत – अशी विकृत भूमिका काही माजी नगरसेवक घेत आहेत. हेच लोक बेकायदा बांधकामांचे मूक पाठीराखे नसून, उघडउघड प्रवक्ते बनले आहेत. केवळ आर्थिक फायद्यासाठी शहराच्या नियोजनाचा बोजवारा उडवण्याची त्यांनी चंगच बांधलेला दिसतो.

जनतेच्या जीवावर ‘दौलतजादा’ खेळ!

पाच वर्षात पालिकेतील निधी मिळाला नाही म्हणून आता बेकायदा इमारती, चाळी बांधण्याचा डाव पुन्हा रंगू लागला आहे. कारण निवडणुका डोळ्यांसमोर आहेत आणि त्यासाठी पैसा हवा. मग काय, किरायाने दिलेले गाळे, जबरदस्तीने मिळवलेल्या सदनिका म्हणजेच ‘रोजी’ बंद पडू नये म्हणून काही नगरसेवक अक्षरशः न्यायव्यवस्थेच्या, प्रशासनाच्या आणि शहरवासीयांच्या तोंडावर थुंकत आहेत.

पालिकेच्या हातोड्यामुळे झोप उडालेल्या माफिया-सेवकांची तडफड!

उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे, पालिकेच्या कारवायांनी बेकायदा इमारतींवर हातोडा पडू लागला, आणि त्यामुळे अनेकांचे धंदे बंद पडू लागले. याचाच परिणाम म्हणजे, आता हे माजी नगरसेवक "कोणत्याही अधिकाऱ्याचा काहीही झाला तरी बेहत्तर, पण आमची इमारत उभी राहिली पाहिजे!" असा संतापजनक हट्ट धरून बसले आहेत.

शहराच्या विध्वंसामागे छुपी हातमिळवणी

१० वर्षात ४२ नगरसेवक बेकायदा बांधकामांना पाठीशी घालतात, हे आकडे पुरेसे बोलके आहेत. महासभांमध्ये या विषयावर लक्षवेधी चर्चेपासून मुद्दाम टाळाटाळ केली गेली. काही माजी महापौर व बाहुबली नगरसेवकांनीच या गोष्टींना राजकीय संरक्षण दिलं. माहिती अधिकारातून हे वास्तव समोर आलं आहे.

शहरवासीयांनी आता डोळे उघडावे!

बेकायदा बांधकामांच्या माध्यमातून आपली खुर्ची आणि खिसा सांभाळणारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी खरंतर विकासाचे शत्रू आहेत. त्यांचा मूळ हेतू जनतेसाठी काम करणे नव्हे, तर शहराचा तुकड्या-तुकड्यांत सौदा करणे हा आहे.

---

हीच खरा वेळ आहे — भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्याची!
शहराच्या भविष्याशी खेळणाऱ्या 'विकासद्रोहीं'ना जनतेनेच आता धडा शिकवायला हवा!

Address

Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमचं कल्याण - Aamcha Kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आमचं कल्याण - Aamcha Kalyan:

Share