23/07/2017
save Warli Painting | वारली चित्रकला !
पर्यावरण, जैव वैविध्य, नसर्गिक संसाधने, मानवी मूल्य, स्वावलंबी अर्थव्यवस्था, इत्यादी जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपरिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. जगभरातील आदिवासी समुदायांनी पिढ्या न पिढ्या हे जतन केले आहे, याचे दर्शन सोप्या भाषेत चित्रलिपीत वारली चित्रातून होते.
आज आदिवासी समाजात मौखिक आणि इत्तर स्वरूपात असलेले पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा या पुढे मोठे आव्हान आहे. मोठ्या कंपन्या आणि व्यापार विविध माध्यमातून या सगळ्यांचा परस्पर उपयोग त्यांच्या नफ्यासाठी करतात (उदाहरण - वनऔषधी, कला, कारागिरी, साधन सामग्री, जीवनोपयोगी वस्तू, फळे, इत्यादी).
वारली चित्रकलेचे पण तेच होते आहे. खूपच कमी आदिवासी कलाकारांना संधी आणि त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळतो. आणि आता तर विदेशी कंपन्या वारली चित्रकलेवर स्वामित्व मिळवत आहेत. या वेळेस जर आपण गांभीर्याने घेतले नाही तर जसे भारताला हळद, कडू निंब, बासमती च्या बौद्धिक संपदा नोंदवताना घाम आला होता तसे होणार आहे.
मोठे मोठे प्रकल्प आणि विकासाच्या नावाने त्यांची जल जंगल जमीन घेऊन कृत्रिम औद्यीगिकरण लादण्यापेक्षा, पर्यावरणाला अनुकूल आणि आधुनिक तंत्रज्ञाना सोबत पारंपरिक सामूहिक उद्योग उभे करू शकलो तर आदिवासी समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी हातभार लागेल. यासाठी समाजात जागरूकता, कौशल्य विकास, शिक्षण पद्धती, प्रसाशनाची संवेदनशीलता यांचा गांभीर्याने विचार व्हावा
save Warli Painting | वारली चित्रकला !
पर्यावरण, जैव वैविध्य, नसर्गिक संसाधने, मानवी मूल्य, स्वावलंबी अर्थव्यवस्था, इत्यादी जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपरिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. जगभरातील आदिवासी समुदायांनी पिढ्या न पिढ्या हे जतन केले आहे, याचे दर्शन सोप्या भाषेत चित्रलिपीत वारली चित्रातून होते.
आज आदिवासी समाजात मौखिक आणि इत्तर स्वरूपात असलेले पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा या पुढे मोठे आव्हान आहे. मोठ्या कंपन्या आणि व्यापार विविध माध्यमातून या सगळ्यांचा परस्पर उपयोग त्यांच्या नफ्यासाठी करतात (उदाहरण - वनऔषधी, कला, कारागिरी, साधन सामग्री, जीवनोपयोगी वस्तू, फळे, इत्यादी).
वारली चित्रकलेचे पण तेच होते आहे. खूपच कमी आदिवासी कलाकारांना संधी आणि त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळतो. आणि आता तर विदेशी कंपन्या वारली चित्रकलेवर स्वामित्व मिळवत आहेत. या वेळेस जर आपण गांभीर्याने घेतले नाही तर जसे भारताला हळद, कडू निंब, बासमती च्या बौद्धिक संपदा नोंदवताना घाम आला होता तसे होणार आहे.
मोठे मोठे प्रकल्प आणि विकासाच्या नावाने त्यांची जल जंगल जमीन घेऊन कृत्रिम औद्यीगिकरण लादण्यापेक्षा, पर्यावरणाला अनुकूल आणि आधुनिक तंत्रज्ञाना सोबत पारंपरिक सामूहिक उद्योग उभे करू शकलो तर आदिवासी समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी हातभार लागेल. यासाठी समाजात जागरूकता, कौशल्य विकास, शिक्षण पद्धती, प्रसाशनाची संवेदनशीलता यांचा गांभीर्याने विचार व्हावा