Hindavi swarajya group, chandegaon

  • Home
  • Hindavi swarajya group, chandegaon

Hindavi swarajya group, chandegaon "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश?

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण देताना आचार्य विनोबा म्हणतात की,आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलल...
07/08/2024

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण देताना आचार्य विनोबा म्हणतात की,

आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही.

तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते. पण कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो. आणि... शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो...

पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पत, प्रतिष्ठा अवलंबुन असते.

म्हणूनच....
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी...
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी...
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी...
कधी विसरु नये,अशी नाती हवी...

*तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा......*  *पश्चात्ताप* भूतकाळ बदलू शकत नाही आणि *काळजी* भविष्याला आकार...
07/08/2024

*तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा......*

*पश्चात्ताप* भूतकाळ बदलू शकत नाही आणि *काळजी* भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच *वर्तमानाचा* आनंद घेणे हेच जीवनाचे *खरे सुख* आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.

ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.
*कृतज्ञ रहा*.

ज्या कामातुन देवाने तुमच्यासाठी सर्व दिले, तेच काम इतर लोक करत आहेत पण अनेकांना तुमच्या एवढे यश मिळालेले नाही.
*कृतज्ञ रहा*.

तुम्ही रोज जो रस्ता वापरुन घरी सुरक्षित पोहचता तोच रस्ता वापरताना तिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावलेत.
*कृतज्ञ रहा*.

ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवनात तुमच्यापेक्षा जास्त दु:ख आहे.
*कृतज्ञ रहा*.

हॉस्पिटलमध्‍ये वापरलेल्या ज्या बेड वर तुम्‍ही बरे झालात आणि तुम्हाला डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
*कृतज्ञ रहा*.

ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
*कृतज्ञ रहा*.

कृतज्ञ रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त
*"ईश्वरी कृपा"* आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.

*म्हणुनच*
हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.

*वय* आणि *पैसा* यावर कधीच *गर्व* करू नये. कारण ज्या गोष्टी *मोजल्या* जातात, त्या नक्कीच *संपतात*. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे *आत्मविश्वास*. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर *तुम्ही चांगले* आहात म्हणून.

*नेहमी आनंदी रहा. खुश रहा सकारात्मक रहा*

तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..बँ...
07/08/2024

तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..

बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्‍याने लाखाच्या कर्जाला किमान १० हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.

व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्‍हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर शेतकऱ्याच्या चिमुरडीलाही चिरडण्याचा प्रयत्न करतो. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

भाजीमार्केट दलालांना वाटतं शेतकऱ्यांची पट्टी कधी देऊचं नाही आणि सगळा पैसा घशात घालावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं......

साखरसम्राट यांना वाटतं प्रत्येक 10 टन ऊसा मागे 1 ते 2 टन काटा मारू, ऊसाचे बिल 6-6 महिने द्यायचं नाही,,, मरतो का शेतकरी एवढ्यानं......

लाईन वाल्या साहेबाला वाटते शेतकऱ्याने विजबिल पूर्ण भरावं आणि डीपी मेंटनस निघाला तर सर्व शेतकऱ्यांनी लाख रूपये जमा करून आपल्याकडे द्यावे आणी ते आपण मोठ्या साहेबाला पकडून अर्धे अर्धे खिशात घालावे. वर दिवाळीलापण घरोघरी उकळतोच. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

गावगुंडाला वाटतं आपल्यालाही मोकळ्यामोकळ्या १०- १५ हजार मिळवायचे असेल तर करा त्या शेतकऱ्याचा शेतीचा रस्ता बंद, करा खोटानाटा आरोप आणि उकळा पाहिजे तेवढे पैसे. मरतो का शेतकरी एवढ्यानं

कृषी विभागातील साहेबांना वाटते शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना म्हणजे आपल्या बापाच्याचं आहेत, त्या विकुनचं खाव्यात. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

खत-बियाने दुकानदाराला वाटते बोगस खत-बोगस बियाने शेतकऱ्याला कधी नगदी तर कधी उधार देवुन आपण आपला नफा करून घ्या. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शेतमजुर तर मजुरी देवुन वर दारू ची मागणी करतंय. शेतातला भाजीपाला पाहिजे तेव्हढा नेतायं आनं नाही म्हणलं तर निघाला काम सोडुन. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शहरातल्या लोकांना वाटतं शेतमाल भाजीपाला १०० रूपयात वर्षभर पुरेल एव्हढा द्यावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

टी व्ही चॅनल वाल्यांना वाटतं जे शेतकरी म्हणेल *"शेतीत दहा लाख उरते"* अशाच शेतकऱ्यांची मुलाखत दाखव.. आणि उकळावं लाखभर; मरतो का शेतकरी एवढ्यानं..

विरोधी पक्षाला वाटते आपली सत्ता आनायची असेल तर शेतकरीच महत्वाचा..

आणि सरकारला वाटते शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी कमी झाला की देशातील सर्व समस्या संपतील म्हणून पहीले यांना संपवा देश आपोआप सुधारेल...

टीप :-..... अजुन कुणाचे काही राहीले असतील तर हिसाब न देता काढुन घ्या, कारण मी शेतकरीराजा आहे आणि माझा देश कृषीप्रधान आहे....मीच राजा आणि मीच प्रधान.. मग दोष कुणाला...?

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindavi swarajya group, chandegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Event/venue?

Share